कृषीपुणे जिल्हा ग्रामीण

खोरच्या अंजीर बागांना ढगाळ हवामानाचा फटका ,अंजीर उकल्याने बाजारभावात कमालीची घसरण

दौंड(BS24NEWS)

सध्या सुरु असलेल्या ढगाळ हवामानाचा मोठा फटका अंजीर उत्पादक शेतकरी वर्गाला बसत असताना दिसत आहे. दौंड तालुक्यातील खोर गावात अंजीराचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जात आहे. जवळपास ६० हेक्टर इतके क्षेत्र हे अंजीर बागेचे खोरच्या परिसरात घेतले गेले आहे. मात्र सद्या सुरु असलेल्या ढगाळ, रोगट हवामानाचा मोठा फटका या अंजीरच्या फळाला बसत आहे.

ढगाळ हवामानामुळे अंजीर फळं हे उकलत असून गोडी देखील कमी होत आहे. अशा ढगाळ हवामानामुळे एकाच वेळी क्षमतेपेक्षा जास्त उत्पादन निघले जात आहे. परिणामी अंजीर उकलले गेल्याने बाजारभावात देखील कमालीची घसरण झाली आहे. सद्या ३० ते ३५ रुपये प्रती किलो दराने अंजीर व्यापारी वर्गाच्या माध्यमातून विकले जात आहे. ढगाळ हवामानाचा फटका हा अंजीराच्या पानावर देखील बसला जात असून करपा जातीचा रोग या पानावर पडत असल्याचे पाहावयास मिळत आहे. यामुळे शेतकरी वर्गाचे मोठे आर्थिक नुकसान ह्या रोगट ढगाळ हवामानामुळे होत आहे. हवेमध्ये अद्रता वाढल्याने अंजीर तडकले जात आहे. आणी पाऊस होऊन गेल्यावर थंड हवा सुटली की पानगळ होऊन करपा जातीचा रोग पडला जात आहे. यामुळे या परिसरातील शेतकरी वर्ग अंजीर पिकाचा पिक विम्यात समावेश करण्याची मागणी करीत आहे .

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!