मनोरंजन

युजवेंद्र चहलने रचला इतिहास, टी-२० मध्ये भारतासाठी ही कामगिरी करणारा पहिला गोलंदाज

भारतीय क्रिकेट संघ आणि राजस्थान रॉयल्सचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहलने इतिहास रचला आहे. टी-२० क्रिकेटमध्ये भारतासाठी मोठी कामगिरी चहलने आपल्या नावे केली आहे.

आयपीएल २०२४ चा ५६ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवला जात आहे. दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यात भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने मोठी कामगिरी आपल्या नावे केली. युजवेंद्र चहलने दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतला बाद करत एक विकेट मिळवली. पण या विकेटसह चहलने टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास घडवला आहे.

युजवेंद्र चहल हा टी-२० क्रिकेटच्या इतिहासात ३५० विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरलाआहे. भारतासाठी ही मोठी कामगिरी आजपर्यंत कोणताही खेळाडू करू शकलेला नाही. भारतीय गोलंदाज म्हणून चहलने मोठा पराक्रम आपल्या नावे केला आहे. भारताकडून T20 मध्ये सर्वाधिक ३५० विकेट घेण्याचा विक्रम युजवेंद्र चहलच्या नावावर झाला.

चहलनंतर पियुष चावला या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर ३१० विकेट्स आहेत. यानंतर रविचंद्रन अश्विन ३१० विकेट्ससह तिसऱ्या स्थानावर आहे. भुवनेश्वर कुमार २९७ विकेट्ससह चौथ्या आणि अमित मिश्रा २८५ विकेट्ससह पाचव्या स्थानावर आहे.

भारतासाठी टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज

युझवेंद्र चहल – ३५० विकेट्स
पियुष चावला – ३१० विकेट्स
रविचंद्रन अश्विन- ३०६ विकेट्स
भुवनेश्वर कुमार- २९७ विकेट्स
अमित मिश्रा- २८५ विकेट्स

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!